Saturday, December 14, 2013

तुमचं भाग्य तुम्हीच लिहिता........




ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सुख-दु:खाचे निर्माते तुम्हीच आहात, त्या दिवशी तुम्ही स्वत:चे मालक व्हाल. (खऱ्या अर्थी स्वतंत्र व्हाल). त्या दिवशी जीवनाचा खरा प्रारंभ होईल. आता निवड तुमच्या हाती.
नियतीमध्ये फक्त विषाद आणि वैफल्याची लांबलचक शंृखला लिहून ठेवली आहे, असं काहींना वाटतं. खरं तर हे तुमच्या हाती असतं. तुम्ही जसं लिहीत जाल तशी अक्षरं उमटत जातील. विषाद तुम्हाला इतर कुणी देत नाही. तर ती तुमची निवड असते. तुम्ही स्वत: तो स्वीकारला आहे. आनंदसुद्धा अन्य कुणी देणार नाही. तुम्ही निवडला तर मिळेल. तुम्ही जे शोधता (निवडता, स्वीकारता) तेच तुमचं भाग्य असतं.
भाग्य कुणी दुसऱ्यानं तुमच्या भाळी लिहिलं आहे, असं भाग्याबद्दलची जुनी धारणा सांगते. माझं असं म्हणणं आहे, की भाग्य लिहिलेलं नाही. रोज लिहावं लागतं. ते आणखी कुणी लिहीत नाही. तुम्हीच ते लिहीत असता. कदाचित ते लिहिताना तुम्हाला जाणवत नाही. त्याचं भान तुम्हाला नसतं. कदाचित इतक्या अजाण पातळीवर तुम्ही ते लिहीत असाल की लिहिलं गेल्यावर ध्यानी येतं की काही तरी लिहिलं गेलं आहे. लिहिते वेळी तुम्ही स्वत:ला पकडू शकत नाही. आपली जाण, आपलं भान कमी पडतं.
इतर कोणी आपलं भाग्य लिहीत असेल तर सारा धर्म व्यर्थच म्हणायचा. मग तुम्ही काय करणार? तुम्ही एखाद्या असहाय मासोळीसारखे आहात असं म्हणावं लागेल. वाळवंटात फेकलं तर तिथं तडफडत राहाल. कुणी जलाशयात टाकलं तर ठीक! थोडक्यात काय, तुम्ही कुणाच्या तरी हातचं खेळणं आहात. कठपुतळी आहात. मग तुम्ही कितीही मुक्त व्हायचं म्हटलंत तरी कसे होणार? तुमच्या भाग्यात मुक्ती लिहिली असेल तर मिळेल, नाही तर कशी मिळणार?
भाग्यात लिहिली म्हणून मिळाली तिला काय मुक्ती म्हणायचं? कुणाला विवशतेनं मुक्त व्हावं लागलं तर तशी मुक्तीसुद्धा एका अर्थी पारतंत्र्यच म्हणावं लागले. कुणी आपल्या स्वत:च्या इच्छेनं स्वत: निवड करून नरकात गेला, कुणी स्वत:हून कारागृहात निवास करणं पसंत केलं, तर आपण निवड करून स्वीकारलेलं ते कारागृहसुद्धा स्वातंत्र्यसूचक असतं. मुक्ती हे काही स्थान नाही. कारागृह हेही स्थान नव्हे. तुमच्या अंगी निवडीची क्षमता असणं, स्वत: निवड करणं, त्यानुसार आचरण करणं या गोष्टीत मुक्ती सामावली आहे. आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य नसेल आणि माणूस केवळ भाग्याच्या हातचं खेळणं असेल तर मुक्ती अशक्य आहे मग तुम्ही पुण्य करा, तुम्ही भानावर या, जागृत व्हा वगैरे सांगण्यालाही काय अर्थ उरला? असेल नशिबात तर येईल जाग! येईल भान!
     माणसानं भाग्याची ही धारणा स्वीकारली कारण त्यामुळे त्याची मोठी सोय झाली. त्याला कुठलंच उत्तरदायित्व घेण्याची गरज उरली नाही. सारी जबाबदारी दूर झाली. नि कुणी दुसऱ्याच्या खांद्यावर गेली. आपल्या खांद्यावरची जबाबदारी परमात्म्याच्या अंगावर टाकून तुम्ही मोकळे होता. तुम्ही स्वत:च कर्म करत असता. जे तुम्ही करता तेच घडतं. तुम्ही निवड करता. तुम्ही बीज पेरता. तुम्हीच पीक घेता. पण परमात्म्याला मध्ये आणून त्या कृत्यांबद्दलच्या जबाबदारीचा स्वत:चा भार हलका करता.
पण असे असहाय होऊन तुम्ही स्वत:लाच फसवत असता. मनाची ही फार मोठी चलाखी असते. जबाबदारी कुणा दुसऱ्याच्या अंगावर झटकून स्वत: मोकळं व्हायचं. ही युक्ती आपल्या आत इतकी खोलवर रुजलेली असते, की आस्तिक परमेश्वरावर भार टाकून मोकळा होतो. नास्तिक निसर्गावर जबाबदारी टाकून स्वत: नामानिराळा होतो. कम्युनिस्ट इतिहासावर जबाबदारी ढकलतात. कुणी अर्थशास्त्रावर तर कुणी राजकारणावर. अशी कशाकशावर जबाबदारी झटकून माणूस मोकळा राहू पाहतो. हे सारे एकाच युक्तीचे विविध अवतार आहेत. पण जबाबदारी टाळायला सगळे एका पायावर तयार असतात.
  थोडा विचार करा. ज्या क्षणी तुम्ही जबाबदारी झटकता त्या क्षणी तुम्ही तुमच्या आत्म्याला हरवून बसता. तुम्ही स्वत: निवड करता. त्यानुसार आचरण करण्याची जबाबदारी स्वीकारता आणि परिणामांचीही जबाबदारी स्वीकारता, तेव्हा तुम्ही स्वतंत्र असता. नशीब, भाग्य इत्यादी गोष्टींपासून सावधान राहा. नशीब, भाग्य वगैरे धार्मिक माणसाच्या धारणा नव्हेत.
 तुम्ही स्वत:चं भाग्य लिहीत असता. त्यावर तुम्ही अक्षरं कोरत असता. कदाचित काल लिहिलेलं विस्मृतीत गेलं असेल. पण मी खात्रीनं सांगतो की जरा काळजीपूर्वक शोध घेतलात तर तुम्हाला आपण लिहिलेली अक्षरं सहज लक्षात येतील. त्यांच्यात थोडाबहुत बदल झाला असलाच तरी ओळखू न येण्याएवढा नसेल. आपणच आपलं भाग्य लिहितो हे तुमच्या लक्षात येईल.
ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सुख-दु:खाचे निर्माते तुम्हीच आहात, त्या दिवशी तुम्ही स्वत:चे मालक व्हाल. (खऱ्या अर्थी स्वतंत्र व्हाल). त्या दिवशी जीवनाचा खरा प्रारंभ होईल. आता निवड तुमच्या हाती असेल. दु:खी व्हायचं असेल तर तुम्ही त्याची निवड करा. मी पुन्हा एकदा तुम्हाला सतर्क करतो. नीटपणे निवड करा. (दु:ख निवडायचं तर) थोडंसं, थेंबथेंब दु:ख कशाला, दु:खाचा समुद्र अंगावर घ्या. छातीवर दु:खाचा हिमालय ठेवा. थेट नरकात बुडा. जो काही निर्णय घ्यायचा तो आपणच! हे एकदा निश्चित झालं की मग दु:खाचं पीक आपणच घ्यायला हवं. तुमचा तो निर्णय असल्यानं तुम्हाला वाटत असेल त्या दु:खातच सुख वाटतंय तर ते ठीकच आहे. पण एक गोष्ट ध्यानी ठेवा. चुकूनसुद्धा म्हणू नका की तुमची नियती दुसऱ्याच कुणी तरी ठरवली आहे.
एकदा तुम्ही हे लक्षात घेतलंत की मीच सगळय़ांचा निर्णय करणार आहे, माझं दैव मीच लिहितो, माझी नियती म्हणजे मी केलेली निवड आहे, त्या क्षणी दु:ख निरोप घेईल. सुखाची पहाट उगवेल. सुखाचा सूर्य उदयाला येईल. चमकू लागेल आणि सुख आपल्याच हातात असल्यावर थेंब थेंब सुख कशाला घ्यायचं? सुखाचे मेघ वर्षू देत.
हे सगळं तुमच्याच निर्णयावर अवलंबून आहे. आणि हा अतिशय मूलभूत निर्णय आहे.

                                                                                                      --- स्वप्नील वाघमारे

Monday, October 14, 2013

Deva Tujya Gaabhaaryaalaa

 
 
 

Deva tujya gaabhaaryaalaa

 
 
Deva tujya gaabhaaryaalaa… umbarach naahi….
Sanga kutha theu maata kalenaach kahi 
Deva kutha shodhu tula, Mala sang na….
prem kela evadhach, maza re gunha… 
deva kalajachi haak ek ekadatari… - 2 
majya hya jivachi aag laavu de tujua uri
hey.. aar paar kalajaat ghav ka dila tu
dagadachya kaaljacha dagadacha dev tu 
(ka  Kadhi kuthe swapna virale 
prem harale ….
swapna maze aaj na dhyani khulale 
artha saare sparsha ne ulaghadale…
aar paar kalajaat ghav ka dila tu
dagadachya kaaljacha dagadacha dev tu 
deva kalajachi haak ek ekadatari
majya hya jivachi aag laavu de tujua uri

kaare tadfhad hi ha kaalja madhi
ghusmat tuji re hote ka kadhi 
maansacha tu janma ghe 
daav jo mandala modu de 
(ka haat sutale swash mitale 
thech laage … hann) 
uttaran na prashna kase he padale 
aantaranche antar kase na kalale 
(deva kalajachi haak ek ekadatari
majya hya jivachi aag laavu de tujua uri
aar paar kalajaat ghav ka dila tu
dagadachya kaaljacha dagadacha dev tu 
 
 
 
Lyrics from Duniyadari ....... 

Saturday, July 13, 2013

विचारांची ताकद


विचारांची ताकद



अनेकदा आपण स्वत: काय आहोत यापेक्षा इतर लोक काय सांगतात त्यावर आपण आपलं आयुष्य घडवत असतो . शब्दांची जादू काही तरी जन्माला घालत असते. सकारात्मक काही घडवत असते. फक्त आपला त्या शब्दांवर विश्वास हवा. पण तोच कमी पडतो.
इथे मी एक कथा सांगतो बेडकाची :
 एका छोटय़ा बेडकाच्या मित्रांनी ठरवलं की, आपण धावण्याची शर्यत लावायची. एका उंच मनोऱ्यावर चढायचं होतं. त्या दहा-बारा बेडकांना प्रोत्साहन द्यायला त्यांची बरीचशी बेडूकमंडळी जमली होती. पण सगळ्यांचा सूर नकारात्मकच होता. कुणी म्हणत होतं, ''कसं शक्य आहे इतकी उंच चढण चढणं?'' कुणी म्हणत होतं, ''अशक्यच आहे. उगाचंच वेडेपणा करताहेत ही बेडकं.'' गर्दी मोठमोठय़ाने बोलत होती. काही अंतर चढल्यावर एकामागोमाग एक बेडूक खाली कोसळू लागले. काहींनी मात्र आपली जिद्द कायम ठेवली. ''मला नाही वाटत कुणी एक तरी पोहोचेल वपर्यंत.'' गर्दी बोलतच होती. उरलेल्या बेडकांमधला एकेक बेडूक खाली कोसळत होता. फक्त एक छोटा बेडूक मात्र सरसर वर सरकत होता. गर्दीचा आवाज आता क्षीण झाला होता. पण तो पुढे जातच राहिला आणि अखेर आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलाच. साऱ्यांना आश्चर्य वाटलं आणि कुतूहलही. त्याच्या यशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी सारे त्याच्याभोवती जमले. तेव्हा लक्षात आलं, तो बहिरा होता. कुणाचं काही ऐकण्याच्या पलीकडे तो पोहोचलेला होता.
आयुष्यात आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करणारे अनेक लोक वा त्यांचे नकारार्थी विचार आपल्याबरोबर सतत असणारच आहेत. आपल्या सुंदर स्वप्नांपासून रोखणारे अनेक जण भेटणारच आहेत. आपण ते कानाआड करायला हवेत. अशा वेळी तुम्ही चक्क बहिरं व्हायला हवं. तुम्हाला काय हवंय, काय मिळवायचं आहे हे मनाशी पक्कं ठरवायला हवं. कारण आपल्या विचारांमध्ये कमालीची ताकद असते.
आयुष्यात सकारात्मक वा पॉझिटिव्ह विचारांची गरज पावलोपावली आपलं अस्तित्व जागवत असते. कारण तो विचारच तुम्हाला ताकद देत असतो पुढे जायची, काही घडवायची. तुम्ही जोपर्यंत स्वत:ला त्यासाठी तयार करत नाही तोपर्यंत निराशा येणं वा काहीच सकारात्मक न घडण्याचीच शक्यता जास्त असते. पण एकदा का त्यांची ताकद कळली की चमत्कारही घडू शकतात.

*@*स्वप्नील वाघमारे *@*

Sunday, June 30, 2013

KABIRA ...............






Haan Haannn Re

Kaisi Teri Khudgarzi
Naa Dhoop Chuney Na Chaav

Kaisi Teri Khudgarzi
Kisi Thaur Tikey Na Paav

Kaisi Teri Khudgarzi
Naa Dhoop Chuney Na Chaav

Kaisi Teri Khudgarzi
Kisi Thaur Tikey Na Paav

Ban Liya Apna Paigambar

Tair Liya Tu Saat Samandar
Phir Bhi Sookha Maan Ke Andar

Kyun Rahega

Re Kabira Maan Ja

Re Fakeera Maan Ja
Aaja Tujhko Pukaarein
Teri Parchhaiyaan


Re Kabira Maan Jaa

Re Fakeera Maan Jaa
Kaisa Tu Hai Nirmohi Kaisa Harjaiyaa
Tutti Chaarpaai Wohi

Thandi Purvaai Rasta Dekhein
Dudhon Ki Malaai Wohi

Mitti Ki Suraahi Rasta Dekhein

Kaisi Teri Khudgarzi
Lab Naam Tera Mera Mishri
Kaisi Teri Khudgarzi
Tujhe Preet Purani Bisri

Mast Maula, Mast Kalander
Tu Hawa Ka Ek Bawandar
Bujh Ke Yun Andar Hi Andar

Kyun Rahega

Re Kabira Maan Jaa
Re Fakeera Maan Jaa
Aaja Tujhko Pukaarein
Teri Parchhaiyaan
Re Kabira Maan Jaa
Re Fakeera Maan Jaa
Kaisa Tu Hai Nirmohi Kaisa Harjaiyaa





Song from Movie Yeh Jawaani Hai Deewani
Lyricists : Amitabh Bhattacharya

Monday, May 27, 2013

संघर्ष, स्वत:चा स्वतशी ............





                        संघर्ष, स्वत:चा स्वतशी

 

            जगण्यासाठी प्रयत्नवादी असणं आणि निराश अनुभव टाकून देणं जसं गरजेचं आहे, तसं प्राप्त परिस्थितीचा योग्य अर्थ लावणंही गरजेचं आहे. यासाठी माणसालाही संघर्ष करावाला लागतो स्वत:ला स्वत:शीच, पण इथे तो असतो आतला, अंतर्मनातला..
          सुरवंटाचं फुलपाखरू होण्यापर्यंतची प्रक्रिया फारच जीवघेणी असते. एका अत्यंत कुरूप किडय़ाचं देखण्या फुलपाखरात रूपांतर होणार असतं, त्यासाठी त्याला करावा लागतो जीवघेणा संघर्ष, स्वत:च स्वत:शी केलेला. एकटय़ाने..
          असाच एक फुलपाखरू, धडपडत होता कोषातून बाहेर यायला. त्यापूर्वीचा  सुरवंटाचा संघर्ष आता संपला होता. प्रचंड कष्टाने त्याने स्वत:भोवती कोष विणून स्वत:लाच घडवण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. आता प्रतीक्षा होती कोषातून बाहेर यायची. फुलपाखरू बनण्याचा क्षण आता काही मिनिटांच्या अंतरावर वाट पाहत अधीर झालेला. त्याचं कोषातून बाहेर पडणं निश्चित होतं. कोष फाडून तो किंचित बाहेरही आला. तारेसारख्या पायाचं स्वत:ला उभं करण्यासाठी धडपडणं सुरू होतं..
             हे सगळं एक माणूस बघत होता. थोडा जरा जास्तच संवेदनशील होता तो. बुद्धीपेक्षा मनाने विचार करणारा. फुलपाखराची ती धडपड त्याला अस्वस्थ करू लागली. मी याला मदत करू शकतो का? त्याने स्वत:लाच प्रश्न केला. तेवढय़ात बराच वेळ धडपडणारा तो कोष अचानक स्तब्ध झाला.. काही काळ. आता मात्र काहीतरी करायला हवं, त्याच्या हळव्या मनानं सांगितलं. तो कात्री घेऊन आला. आणि त्याने हलक्या हाताने कोषाचा तो पातळ पापुद्रा कापून विभक्त केला. तो वाट पाहत राहिला.. आता फुलपाखराला सहज बाहेर पडता येईल.. आपले रंगीबेरंगी पंख पसरून तो हवेत मस्त विहरेल.. पण तसं काहीच घडलं नाही. त्याचं अंग सुजू लागलं आणि पंख कोरडे पडू लागले. पंख मोकळे होण्याएवजी अर्धवट मिटलेलेच राहिले.. आता ते कधीच फुलू शकणार नव्हतं. फुलपाखरू कायमचं अपंग झालं होतं.. त्या माणसाला हे कळलं की आपण दाखवत असलेली दया त्या फुलपाखराला कायमची अपंग बनवून टाकणारी ठरलीय, पण खूप उशीर झाला होता. कोषातून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी संघर्ष करणं ही फुलपाखरावर निसर्गाने सोपवलेली जबाबदारी होती. त्यासाठी होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांतून त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारं द्रव्यच त्याला कोषापासून विलग करण्यास मदत करणारं होतं, परंतु त्या माणसाच्या दयेमुळे ना संघर्ष उरला होता, ना त्यातून मिळणारा स्वत:ला सिद्ध करण्याचा आनंद. आता उरलं ते फक्त केविलवाणं जगणं. फुलण्याशिवायचं, विहरण्याशिवायचं!
             आपलंही आयुष्य असंच असतं. पुढे जाण्यासाठी, स्वप्नांमागे धावण्यासाठी संघर्ष गरजेचाच असतो. आणि तो आपला आपणच करायचा असतो. तरच सोन्यासारखं तावूनसलाखून लखलखीतपणे बाहेर पडता येतं. आपल्याला कुणीतरी फक्त घास भरवू शकतो. पण तो घास चावायचा मात्र आपल्यालाच असतो. दुसऱ्याच्या कुबडय़ा आपल्याला फक्त अपंगत्वच देतात. उठून उभं राहायची ताकद आपली आपणच मिळवायची असते. त्यासाठी संघर्ष महत्त्वाचा.. तो आपल्याला घडवत असतो. आपल्यातल्या सुरवंटाचं फुलपाखरू घडवत असतो..
              खूप काही घडवण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा, तसं खूप काही टाकून देणंही. ते सोपं नसतंही अनेकदा, पण आयुष्य पुढे न्यायचं असेल तर प्रयत्न करणं अपरिहार्य असतं.
              आपल्याही आयुष्यात असे जुने काही असतेच. कटू आठवणी, जीवघेणे अनुभव, अपयशाचं ओझं. जोपर्यंत ते आपण टाकत नाही. नव्या अनुभवासाठी स्वत:मध्ये नवी जान भरत नाही, तोपर्यंत नवं आयुष्यही आपल्याला कवेत घ्यायला उत्सुक नसतं. भूतकाळ बरोबर घ्यायचा नसतोच. नाही तर वर्तमानाला जागाच उरत नाही. आणि मग उज्ज्वल भविष्याला तर नाहीच नाही.. 
              जगण्यासाठी प्रयत्नवादी असणं आणि निराश अनुभव टाकून देणं जसं गरजेचं आहे, तसं प्राप्त परिस्थितीचा योग्य अर्थ लावणंही. यासाठी माणसालाही संघर्ष करावा लागतो..  स्वत:ला स्वत:शीच, पण इथे तो असतो आतला, अंतर्मनातला..



*@*   स्वप्नील  वाघमारे   *@*

Saturday, April 27, 2013

Haravali pakhre



Haravali pakhre ........................


kuthe kadhi haravale kase kon jane
Chochitle tyanchya gane
nabhachya manala pade ghor ata
ukhane kase sodavave
kase vage he kalyache phulanshi kalena
kadhi vadhle he durave kalena jurebag ata
suni suni sari
ka kalena ashi ..harvali pakhre ..harvali pakhre ..
harvali haravali pakhare..
ka kalena ashi ..harvali pakhre ..harvali pakhre ..
harvali haravali pakhare..
ti ..avhaghad veli ..kilgul sari (sariiiiii)
ugich  manala  hurhurlavi ....
oooooo.. sanjla hoe jiv halvare...aaa....
je zale gele visarun sare ..
ha veda vara sange ya re angani punha .
ka kalenaaa ashi ..harvali pakhre ..harvali pakhre ..
harvali haravali pakhare..
ka kalena ashi ..harvali pakhre ..harvali pakhre ..
harvali haravali pakhare..
ka kalena ashi ..harvali pakhre ..harvali pakhre ..
harvali haravali pakhare.




******* Haravali pakhre Lyrics (Balak Palak) ******



Friday, April 26, 2013

कम्फर्ट झोन (Comfort Zone )

कम्फर्ट झोन

 

 


आपल्या मनातले  कम्फर्ट झोन आपल्याला थांबवतात की वाढवतात, ते पाहायला शिकणं महत्त्वाचं. एकदा कम्फर्ट झोन म्हणजे काय, आणि त्यात अडकल्यानं किंवा बाहेर पडल्यानं काय होतं, ते समजून घेतलं की कम्फर्ट झोन आपल्याला त्याचा आनंद घेत वाढायला शिकवतो. तसंच दमछाक झाली तर कुठे थांबायला हवं, तेही शिकवतो..
एका लाकडाच्या वखारीत कामातल्या कौशल्याची परीक्षा घेऊन कारागीर निवडण्याची पद्धत असते. एका उमेदवाराचं काम मालकाला फारच आवडतं. त्याचा लाकडं तोडण्याचा वेग इतरांच्या तिप्पट असतो आणि कामही सुबक. अर्थातच त्याचा पगारही इतरांपेक्षा जास्त ठरवला जातो. एकदा परीक्षेत पात्रता सिद्ध केल्यावर तो कारागीर काही दिवस आपल्याच नादात वेगानं काम करत राहतो. त्याचा कामाचा आवाका पाहून मालक खूश असतो. तर इतर कारागिरांना त्याची धास्ती वाटते. त्याच्यामुळे स्वत:चा वेग वाढवण्याचे विविध मार्ग इतरांना शोधावे लागत.
कालांतरानं मालकाच्या लक्षात येतं, की इतरांच्या कामाचा वेग वाढलाय, पण या कारागिराचा वेग एवढा कमी झालाय की, त्याचा पगार देणं परवडत नाहीये. शिवाय पूर्वीपेक्षा कमी काम करूनही तो जास्त थकतोय, कंटाळतोय. या बदलाचं कारण शोधण्यासाठी मालक त्याच्यावर नजर ठेवतो. तो पूर्वीसारखाच वक्तशीर असतो. नेहमीचं काम इमानेइतबारे करत असतो, पण नवीन यंत्रसामग्रीची तो माहितीही करून घेत नाही किंवा आपल्या जुन्या हत्यारांना धारही लावत नाही. हे लक्षात आल्यावर मालक कारागिराला तसं विचारतो.
कारागीर म्हणतो, ''साहेब, काय करू? कामाच्या ओघामुळे हत्यारांना धार करायलाही वेळ मिळत नाही, तर नवीन कुठलं शिकायला? बोथट हत्यारांमुळे काम कमी आणि कष्ट जास्त होत आहेत.''
मालक निर्वाणीनं सांगतो, ''अरे, याच कामाच्या ताणात इतरांनी एकमेकांच्या मदतीनं नवंनवं शिकून स्वत:त सुधारणा केली. तू मात्र एकदा स्वत:ला सिद्ध केल्यावर पुढे सरकलाच नाहीस. तुझी जुनी हत्यारं लवकरच मागे पडतील. हातातलं कसब संपलं तर तुला कायमची रजा देणं मला भाग पडेल.''
कसबी कारागिराची ही कथा कामातलं समाधान, स्वविकसन, अपेक्षा, उत्पादकता अशा बऱ्याच विषयांना स्पर्श करते. स्वत:ची क्षमता मनासारखी सिद्ध होईपर्यंत सर्वजण प्रयत्न करत असतात. पात्रता चाचणीत उत्तीर्ण होऊन जगासमोर आणि स्वत:समोर स्वत:ला सिद्ध केल्यानंतर काही र्वष जातात. नवखेपणा कमी होतो. अनुभवासोबत आत्मविश्वासही वाढतो. कामाची नाडी बरोबर सापडते. सवय झाल्यामुळे कामाचा ताण येत नाही, खूप ऊर्जा लावण्याची गरजही पडत नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमाप्रमाणे आता शेवटपर्यंत हे असंच शांतपणे चालत राहणार आहे, असं आपण गृहीत धरतो.
विनाधडपड, विनाताण सहजपणे काम करता येणं हा 'कम्फर्ट झोन'  टप्पा असतो. चढण चढल्यानंतर आलेल्या डोंगरावरच्या माचीसारखा. पहिला उत्साह थोडा शिथिल पडलेला असतो. स्वत:ला जगासमोर सिद्ध करण्याची अत्यावश्यकता संपलेली असते. या ठहरावाला आपण माची समजतो की, घाटमाथा यावर खूप गोष्टी ठरतात. माची वाटत असेल तर थोडा दम खाऊन तरतरीत होऊन आपण पुढे निघतो. घाटमाथा वाटत असेल तर तिथेच थांबतो. या टप्प्यावर  आपला 'अ‍ॅप्रोच' महत्त्वाचा ठरतो.
करिअरकडे  पाहण्याचा आपला अ‍ॅप्रोच ठरतो, तो 'यश' या शब्दाच्या आपल्या व्याख्येनुसार. आपलं मन कशाला 'यशस्वी' होणं समजतं, याचं भान जोखता आलं तर स्पष्टता घेऊन पुढे जाता येतं. या टप्प्यावर माणसं साधारणत: तीन प्रकारांनी वागताना दिसतात-
पहिला प्रकार असतो तो 'सुखी' माणसांचा. ही माणसं युरोप टूरला गेली तरी 'लंडनमध्ये मस्त पुरणपोळीचं जेवण मिळालं आणि दुपारी निवांत झोप मिळाली. टूर फारच भारी झाली,' असं सांगतात. त्यांची यश आणि सुखाची कल्पना तेवढीच असते. त्यांना स्वत:चा असा कुठलाच विशिष्ट रंग नसतो. एका छोटय़ाशा 'कम्फर्ट झोन'मध्ये ती आयुष्यभर सुखाने राहतात, स्वत:वर खूश असतात. तोच खेळ पुन्हा पुन्हा त्याच उत्साहानं खेळत राहातात. अशांचं प्रमाणही बरंच असतं.
दुसरा प्रकार आपल्या गोष्टीतल्या कारागिराचा. अशांची संख्या सर्वात जास्त असते. त्यांच्यात क्षमता असते, पण 'कम्फर्ट झोन'ला पोहोचल्यावर त्यांच्यात जडत्त्व येतं. आणखी पुढे जाण्यासाठी जे थोडेफार कष्ट घ्यावे लागतात, त्याचा त्यांना आळस यायला लागतो. 'खरं आहे, पण वेळच मिळत नाही,' हे यांचे लाडके शब्द. कधी कधी अपवादात्मक परिस्थिती माणसाला काही काळ जखडून टाकते हे खरं, पण बहुतेकदा 'वेळ नाही'  ही यांची सबब लंगडीच असते.
कॉम्प्युटरसारखी नवीन टेक्नॉलॉजी शिकणं, डिपार्टमेंटच्या प्रमोशनच्या परीक्षा देणं, हे लोक टाळतात. एवढंच कशाला, नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी जबाबदारी घ्यायलाही ते नाखूष असतात. 'वेळ नाही' च्या सबबीत काही दम नाही, हे त्यांनाही मनातून कुठेतरी माहीत असतं. म्हणून तर स्वत:च्या 'कम्फर्ट झोन'मध्ये ते खूप कष्ट करतात. तिथे पर्फेक्शनिस्टही असतात. मात्र विचारांच्या आणि कृतींच्या त्याच त्या चक्रात फिरत राहतात. 'तेच ते तेच ते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत' यामुळे येणाऱ्या साचलेपणापेक्षा, कंटाळ्यापेक्षासुद्धा त्यांना जास्त भीती वाटते ती पुन्हा पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्याची. नवीन कौशल्य शिकायला गेलो आणि जुन्या कौशल्याएवढी उत्तमपणे हे करता आलं नाही तर? त्यापेक्षा झाकली मूठ बरी. अशा काहीतरी स्पष्ट-अस्पष्ट विचारांतून ते नव्याला टाळत राहतात. मात्र थेट नकाराऐवजी, 'वेळ कुठेय?', 'आता काय वय राहिलंय का?',  'ही पुरुषांची / स्त्रियांची कामं' अशा सबबी शोधतात. एक नोकरी सोडून दुसरीत शिरण्याचा विषय असेल तर त्यात जोडीला असुरक्षिततेचीही भीती असते. मात्र या आळस किंवा भीतीकडे बघायचंसुद्धा टाळून अनेकदा हे लोक अनेक सबबी देत स्वत:लाच फसवत असतात.
तिसऱ्या सर्वात छोटय़ा गटातल्या लोकांना माहीत असतं की, हा आलेला टप्पा माचीचाच आहे. अजून कित्येक माच्या असतील, वाटलं तर या डोंगरावरून पुढच्या दुसऱ्या डोंगरावरही जाता येऊ शकतं. चढण्याची क्षमता महत्त्वाची. त्यांची यशाची कल्पना थोडी वेगळी असते. आयुष्यभर एकाच चक्रात फिरायचा त्यांना कंटाळा येतो. त्यांची स्पर्धा स्वत:शीच असते. स्वत:पाशी सिद्ध होणं त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं. त्यातून त्यांचं जगापुढे सिद्ध होणं आपोआप घडत जातं. या व्यक्ती स्वत:त सतत भर घालत असतात. त्यामुळे काळाबरोबर राहातात, ते बिझी असतात, पण तरीही त्यांना नव्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ काढता येतो. आपण एखाद्या 'कम्फर्ट झोन'मध्ये अडकतोय, असं जाणवलं की, ते अस्वस्थ होतात. त्यातून बाहेर पडून नवा 'कम्फर्ट झोन' निर्माण करायला त्यांना आवडतं.
''आपण आज आहोत त्या परिस्थितीत समाधानी राहात गेलो तर उद्या यापेक्षा चांगला असण्याची शक्यताच संपते,'' अशा अर्थाचं एडिसनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. या तिसऱ्या प्रकारच्या लोकांना ते तंतोतंत लागू पडतं.
 या तीनही प्रकारच्या लोकांमध्ये काही गोष्टी चांगल्या तर काही त्रासदायक असतात. अत्यंत स्थितिशील लोकांच्या आयुष्यात आणखी ४० वर्षांनीही फारसा बदल घडत नाही, पण तरी ते समाधानी असतात. दुसऱ्या प्रकारचे लोक त्यांच्या 'कम्फर्ट झोन'च्या विशिष्ट कामांमध्ये राजे असतात. मात्र बदलाला स्वीकारणं राहू दे, ओळखणंही नाकारतात. त्यामुळे मोठा बदल येतो तेव्हा ते सामोरं जाणं टाळतात. त्यातून पुढे वैफल्य येऊ शकतं. तिसऱ्या प्रकारच्या लोकांमुळे जगात बदल घडतात, पण नंतर त्यांना फक्त चढण्यासाठी चढत राहण्याची सवय लागू शकते. त्यांना कायम घाई असते, स्थर्य स्वीकारता येत नाही. दमले तरीही थांबणं त्यांना अपराधी वाटतं. मग या सर्वामधला कुठला प्रकार चांगला समजायचा?  कोणता रस्ता निवडायचा?
खरं तर चांगलं-वाईट या संकल्पनाही सापेक्ष असतात. त्यामुळे चूक-बरोबर, चांगल्या-वाईटाचा निवाडा करण्यापेक्षा आपल्या मनातले  कम्फर्ट झोन आपल्याला थांबवतात की, वाढवतात ते पाहायला शिकणं महत्त्वाचं. कम्फर्ट झोन करिअरसह आपल्या इतर वैयक्तिक गोष्टींबाबतही असतात. विविध टप्प्यांवर स्वत:ला प्रामाणिकपणे प्रश्न विचारून तपासत राहणं योग्य उत्तरापर्यंत नेतं. स्वत:चा कम्फर्ट झोन, आळस, भीती यांच्याकडे त्रयस्थपणे पाहायला असे प्रश्न मदत करतात. नेहमीच्या परिस्थितीत अचानक आलेला बदल स्वीकारायला आपल्या मनाची किती तयारी आहे? कुठल्या जुन्या सवयी सोडणं किंवा नवीन लावून घेणं आपल्याला जमेल/ जमणार नाही? ते यातून स्पष्ट होत जातं आणि कुठल्या परिस्थितीत शिरायला आपण नाखूश असतो, तेही समजतं. उदा. एकटय़ाने लांबच्या प्रवासाला जाणं मला जमेल/आवडेल का? आत्ताच्या आत्ता पॅराग्लायिडग करण्याची माझी तयारी आहे का? चारचौघांत / सभेत / रेडिओ-टीव्हीवर माझे मत मांडू शकेन, असे मला वाटते का?  नावडती नोकरी मी सोडू शकेन का? दुसऱ्या देशात सेटल होऊ शकेन, असे वाटते का? सध्याच्या व्यवसायापेक्षा पूर्ण वेगळा व्यवसाय करणे जमेल का? नवीन भाषा शिकायला आवडेल का? एखादी खोल रुजलेली निर्थक भीती काढण्यासाठी प्रयत्न करावेसे वाटतात का? नवीन काही शिकणं टाळण्यामागचं कारण मला कष्ट नकोत, सुखाचा जीव दु:खात घालायचा नाही हे आहे का? मला बौद्धिक, वैचारिक किंवा शारीरिक आळस आला आहे का? अशा प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तरांतून आपल्या 'कम्फर्ट झोन'बद्दलची स्पष्टता येते. त्यातून स्वत:ची समस्या नेमकी झाली की, आपण तिच्या स्वीकारापर्यंत पोहोचतो. समस्या स्वीकारणं ही सर्वात अवघड अशी पहिली पायरी. त्यानंतर तिला सोडवण्याच्या दृष्टीने आपोआप विचार चालू होतो.
ज्याचे त्याचे 'कम्फर्ट झोन' वेगळे, त्याला स्वीकारण्याची, सामोरं जाण्याची क्षमता वेगळी, त्याच्यावर काम करून पुढे जाण्याच्या इच्छेची तीव्रता आणि क्षमताही वेगळी. पण तरीही काही गोष्टी लक्षात ठेवता येतील-
जेवढय़ा जास्त ठिकाणी आपण 'सहज' असतो, ताणरहित असतो, तेवढा आपला अनुभवही (एक्सपोजर) सहजपणानं वाढतो, त्यानुसार नवीन शक्यतांचा आवाकाही वाढतो. एकदा 'कम्फर्ट झोन' म्हणजे काय आणि त्यात अडकल्यानं किंवा बाहेर पडल्यानं काय होतं, ते समजून घेतलं की शिकायचं असतं ते अनुभवांना वाहनासारखं वापरणं. जसं एक वाहन चालवता येत असेल तर गाडी किंवा मेक बदलला तरी प्रत्येक वाहन नव्यानं शिकावं लागत नाही, फक्त थोडीशी सवय करून घ्यावी लागते तसं. नवीन शिकण्यातून अनुभवायचा तो आनंद आणि त्यातून वाढणारा आत्मविश्वास. एखादी गोष्ट सवयीनं करणं आणि तीच समजून करणं यातून येणारी समृद्वी, जुन्याच गोष्टी नव्या कोनातून पाहणं, नवे नवे कोन आणि प्रतलं शोधायला शिकणं याकडे जेव्हा आपण डोळसपणे पाहायला लागतो तेव्हा 'कम्फर्ट झोन' आपल्याला त्याचा आनंद घेत वाढायला शिकवतो. तसंच दमछाक झाली तर कुठे थांबायला हवं, तेही शिकवतो.

Friday, April 12, 2013

Money Management

Money Management





A man walked into a bank in New York City one day and asked for the loan officer.He told the loan officer that he was going to Philippines on business for two weeks and needed to borrow $5,000.
The bank officer told him that the bank would need some form of security for the loan.Then the man handed over the keys to a new Ferrari parked on the street in front of the bank. He produced the title and everything checked out The loan officer agreed to accept the car as collateral for the loan.
The bank’s president and its officers all enjoyed a good laugh at the guy for using a $250,000 Ferrari as collateral against a $5,000 loan.An employee of the bank then drove the Ferrari into the bank’s underground garage and parked it there.
Two weeks later, the guy returned, repaid the $5,000 and the interest, which came to $15.41.
The loan officer said, “Sir, we are very happy to have had and this transaction has worked out very nicely, but we are a little puzzled. While you were away, we checked you out and found that you are a multi millionaire.
What puzzles us is, why would you bother to borrow “$5,000″.
The millionaire replied: “Where else in New York City can I park my car for $15.41 and expect it to be there when I return”.
Well thats how the rich stay rich, they know a lot more about Money Management. All the millionaires I have met in my life were penny wise.
Look after your Coins and the Rupees will look after themselves.

Tuesday, February 26, 2013

स्वप्रतिमा तयार करताना



स्वप्रतिमा तयार करताना

कुठल्याही क्षेत्रात मिळणारे यश हे प्रयत्नांवर अवलंबून असते. प्रयत्न हे ध्येयांवर अवलंबून असतात. आपण स्वत:साठी कुठले ध्येय निवडतो हे आपल्या 'स्वप्रतिमेवर' अवलंबून असते. तेव्हा या स्वप्रतिमेची जडणघडण कशी होते आणि जर आपल्या स्वप्रतिमेत आमूलाग्र बदल घडवून आणायचे असतील तर काय केले पाहिजे याचा विचार करू या.


मुलांच्या भावनिक व मानसिक सशक्तीकरणासाठी तीन सूत्रांची गरज आहे. पहिले सूत्र म्हणजे या विषयाशी संबंधित माहिती गोळा करणे. (Information) दुसरे सूत्र म्हणजे संप्रेरणा (Inspiration) म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्यातच सुप्तावस्थेत असलेल्या शक्तिस्थानाची ओळख करून देणे आणि त्याला जे वाटते त्यापेक्षा हजार पटीने अधिक अशी क्षमता त्याच्यात आहे याची जाणीव करून देणे. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे सूत्र म्हणजे परिवर्तन (Transformation) म्हणजे आपण एका विशिष्ट परिस्थितीला विशिष्ट तऱ्हेने प्रतिक्रिया व्यक्त करतो. परिवर्तन म्हणजे परिस्थिती तीच पण आपली प्रतिक्रिया मात्र वेगळी असणे. या त्रीसूत्रीचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी आपल्याला थोडे मानसशास्त्र जाणून घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक मानवी जीव जेव्हा जन्माला येतो तो एखाद्या संगणकासारखा असतो. संगणकाचे प्रामुख्याने दोन भाग असतात. एक भाग म्हणजे हार्डवेअर म्हणजे किचकट इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, ज्यांचा संगणक बनलेला असतो. ते संगणकाचे शरीर आणि दुसरा भाग म्हणजे 'सॉफ्टवेअर'. संगणक ज्या आज्ञावलीचा (Algorithm) वापर करून काम करतो ती ऑपरेटिंग सिस्टम. माणसाचेही तसेच असते. हार्डवेअर म्हणजे शरीर आणि सॉफ्टवेअर म्हणजे एक सव्‍‌र्हायव्हल (Survival) नावाची आपरेटिंग सिस्टम. जी जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असते.
या आज्ञावलीनुसार प्रत्येक जिवाला आपल्या पंचेंद्रियांच्या साहाय्याने आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करावे लागते. त्याचा अनुभव घ्यावा लागतो. त्या नंतर तो अनुभव जगण्याच्या दृष्टीने उपकारक की अपायकारक आहे या विषयी निष्कर्ष काढावा लागतो. ती घटना या निष्कर्षांसकट आपल्या स्मृतीकप्प्यात कायमची साठवली जाते. त्याचा उपयोग तशाच तऱ्हेच्या किंवा तत्सम वाटणाऱ्या भविष्यकालीन घटनांना प्रतिक्रिया देण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या रांगणाऱ्या बालकासमोर एखादी जळती मेणबत्ती ठेवली आणि आजूबाजूला कोणी लक्ष देणारे नसेल तर आज्ञावलीनुसार तो त्या मेणबत्तीचा अनुभव घेऊ पाहतो आणि ज्योतीवर हात ठेवतो, हाताला चटका बसताच त्या मेणबत्तीचे चित्र 'धोकादायक' अशा निष्कर्षांसकट मनात साठवले जाते व पुन्हा जर तो अशा मेणबत्तीच्या संपर्कात आला तर आता शहाणे झालेले ते मूल त्या मेणबत्तीला हात लावणार नाही. त्याच्यासमोर जर आजकाल मिळणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मेणबत्त्या ज्या तशाच लुकलुकतात त्या जरी ठेवल्या तरी तो त्याला हात लावणार नाही. अशी प्रक्रिया फक्त मानवच नव्हे तर थोडय़ाफार फरकाने सर्वच प्राणी वापरतात. पण मानवात आणि इतर प्राण्यांमधला महत्त्वाचा फरक असा की, फक्त जिवंत राहणे हेच मानवी जीवनाचे ध्येय कधीच नसते. त्याला निरंतर प्रगतीची ओढ लागलेली असते. प्रगती करण्यासाठी काही तरी नवीन घडवावं लागतं. त्यासाठी या प्रक्रियेला छेद देण्याची 'रिस्क' घ्यावी लागते. मानवाने आजपर्यंत असे अगणित धोके पत्करलेले आहेत म्हणूनच आजची ही प्रगतिमान आधुनिक संस्कृती आपण आजूबाजूला पाहतो. खरे म्हणजे यातच माणसाचे 'माणूसपण' साठवलेले आहे.
लहान मूल जेव्हा जन्माला येते ते कोरी पाटी घेऊन! तो व्यक्ती म्हणून कोण आहे? त्याची क्षमता काय? याची त्याला काहीच जाणीव नसते. मी कोण आहे याच्या तो सतत शोधात असतो. अशा वेळी त्याच्या आयुष्याला पहिला आरसा म्हणजे त्याचे आई-वडील! त्यांनी कळत-नकळत केलेल्या विधानांचा तो अर्थ काढतो. त्यावर विश्वास ठेवतो. आई म्हणते तू वेंधळा आहेस, तापट आहेस किंवा हळवा आहेस. तेव्हा तो वेंधळा किंवा तापट किंवा हळवा होतो. जसजसे हे मूल मोठे होत जाते तसतसे त्याच्या 'आरशांची' संख्या वाढायला लागते. आता त्यात त्याचे नातेवाईक, आजोबा, आजी, काका, मोठे भाऊ, शाळेतले शिक्षक, इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये मिळणारे मार्क्सदेखील सामील होतात. त्या प्रत्येकाने त्याच्याविषयी व्यक्त केलेली मते त्याला खरी वाटतात आणि त्यातून त्याचे एका विचित्र आकाराचे व्यक्तिमत्त्व साकारतं. ज्याचा आकार आजकालच्या मॉर्डन पेंटिंगइतकाच अतक्र्य आणि अनाकलनीय असतो. काही झाले तरी तो 'मी' असतो. मला जर जगायचे असेल तर मी ज्याला माझे म्हणतो असे व्यक्तिमत्त्व जिवंत रहायला हवे. त्याला कळत असते वेंधळपण असणे जीवनात फार उपयोगाचे नाही पण तो मोठय़ा प्रेमाने आपले वेंधळेपण जपत राहतो. थोडक्यात आपल्या संपर्कात अनेक व्यक्ती येतात त्या अनवधानाने किंवा मुद्दाम काही 'रिमार्कस्' पास करतात, अनेक परीक्षांना आपण सामोरे जातो त्यात कधी जास्त कधी कमी मार्क्स मिळतात. शिक्षक आपल्याविषयी काही निष्कर्ष काढतात. उदा. ''तू ना गणितात हुशार, पण भाषा विषय मात्र जमणं कठीण!'' अशा तऱ्हेच्या अनेक अनुभवांचे अर्थात रूपांतर केले जाते. त्यातून आपला जिच्यावर काहीच प्रभाव नसलेली, एक आत्यंतिक योगायोगाने बनलेली 'स्वप्रतिमा' आकाराला येते. हे म्हणजे आपण जर एखाद्या खेडय़ाच्या जत्रेत गेलो तर तिथे एक आरसेमहल असतो. त्यातल्या प्रत्येक आराशामधले आपले प्रतििबब वेगवेगळे असते. एकात आपण प्रमाणाबाहेर फुगलेले दिसतो, दुसऱ्यात अगदीच काटकुळे दिसतो, तिसऱ्या आरशात डोके मोठे पायाची मात्र काडी झालेली असते, या सगळ्या प्रतिमा हीच आपली खरी प्रतिबिंबे आहेत, असे जर गृहीत धरले तर जो काही प्रचंड गोंधळ होईल तो म्हणजे आपली 'स्वप्रतिमा!'
थोडक्यात, आपल्या स्वत:विषयीच्या आणि स्वक्षमतेबद्दल असणाऱ्या धारणा या भूतकाळात केवळ योगायोगाने घडलेल्या घटनांचे जे नकारात्मक निष्कर्ष काढले जातात त्यांची निष्पत्ती असते. शिक्षक म्हणून मी अनेक वेळा अनेक विद्यार्थाच्या बाबतीत हे अनुभवलेले आहे. एका परीक्षेच्या निकालानंतर एक मुलगा हसत हसत वर्गाबाहेर चालला होता. त्याला विचारले, ''काय रे किती मार्क्स मिळाले?'' तर तो सहज म्हणाला, ''सर फक्त ५०पकी फक्त १०.'' मी म्हणालो, ''याचे तुला काहीच वाटत नाही, एवढे कमी मार्क्स मिळाले तरी?'' तो म्हणाला, ''सर होतं असं कधी कधी, मागच्या वेळेला नाही का चांगले मार्क्‍स मिळाले. पुढच्या वेळी बघा मी दाखवतो चांगले मार्क्स मिळवून.'' आणि तो निघून गेला त्याच वेळी एक दुसरा विद्यार्थी अगदीच रडकुंडीला आला होता. त्याला विचारलं तर तो म्हणाला, ''सर ५०पकी फक्त १०च मार्क्स मिळाले, सर मला नाही वाटत की मी आय.आय.टी.त जाऊ शकेन! '' म्हणजे घटना एकच होती परंतु निष्कर्ष मात्र कमालीचे विरुद्ध होते आणि त्यामुळे निर्माण होणारे भविष्यदेखील वेगळे होणार होते. एक मुलगा जोमाने अभ्यासाला लागणार होता, दुसरा मात्र निराशेच्या गत्रेत खोल रुतत चालला होता, हळूहळू पराभूत मनोवृत्तीच्या बळी होत होता.
दुसरे उदाहरण घेऊ या, दोन विद्यार्थी एका परीक्षेला बसतात. एकाला ८५ तर दुसऱ्याला ७५ मार्क्स मिळतात. पुढच्या परीक्षेमध्ये दोघांनाही ८० टक्के मार्क्स मिळतात परंतु पहिला त्यामुळे निराश होतो. दुसरा विद्यार्थी मात्र खूष होतो. नंतर जेव्हा परीक्षा घेतली जाते तेव्हा पहिल्याला ७५ टक्के आणि दुसऱ्याला मात्र ८५ टक्के मार्क्स मिळतात. खरे म्हणजे घटना तीच पण भूतकाळ वेगळा आणि त्यामुळे निघणारे निष्कर्ष वेगळे व भविष्य मात्र निष्कर्षांनुसार वेगवेगळे!
लक्षात घ्या, घटना या प्रत्यक्षात घडतात पण अर्थ मात्र मनात असतात. एकाच घटनेचे अनेक अर्थ काढता येतात आणि त्यातल्या एक अर्थच खरा किंवा खोटा असे नसते. परंतु आपली ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला अर्थ काढल्याशिवाय गप्प बसू देत नाही तेव्हा दोन तऱ्हेचे निष्कर्ष घटनांमधून काढता येतात. पहिल्या तऱ्हेचे निष्कर्ष नकारात्मक आणि आपली गती खुंटविणारे असतात. तर दुसऱ्या प्रकारचे निष्कर्ष आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे नेणारे असतात. कुठले निष्कर्ष निवडायचे याचे मानव म्हणून आपल्याला स्वातंत्र्य असते. या स्वातंत्र्याचा जर आपण मुक्त वापर केला तर घटनेपासून व भूतकाळापासून मुक्त असा स्वतंत्र भविष्यकाळ आपल्याला घडवून आणता येतो.
भूतकालीन घटना बदलता येत नाहीत, पण त्यातून आपल्याविषयी काढलेल्या निष्कर्षांना मात्र मूठमाती देता येते. असे जर झाले तर जन्माला येणारे प्रत्येक मूल जसे एक कोरी पाटी घेऊन जन्माला येते, ज्यात अगणित आणि असामान्य शक्यता लपलेल्या असतात. त्यांचे पुनरुज्जीवन आपल्याला कुठल्याही क्षणी करता येते.
यानुसार आपल्या पाल्याची स्वप्रतिमा बदलण्यात आपल्याला सक्रिय भाग घेता येतो. नकारात्मक निष्कार्षांपासून त्याचे संरक्षण करता येते. आपणदेखील अनेक नकारात्मक निष्कर्ष पाल्यांच्या माथी मारतो त्यापासून स्वत:लाच परावृत्त करणे हे पालकांचे व शिक्षकांचे कर्तव्य आहे.
बालमानसशास्त्र, बालसंगोपन म्हणजे काय? याची काहीच कल्पना नसताना आपण सगळेच एके दिवशी आई किंवा बाप होतो. याविषयातला आपला एकुलता एक अनुभव म्हणजे आपल्या आई-वडिलांनी आपले केलेले संगोपन. तेव्हा आपले आपल्या पाल्यांच्या संगोपनाविषयीचे सर्व निर्णय आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या वागणुकीला दिलेली आपली प्रतिक्रिया असते. पण यातून अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.


 ------   स्वप्नील वाघमारे 

Saturday, February 9, 2013

Mujh mein tu, tu hi tu basa ......


 Mujh mein tu, tu hi tu basa  ............







Mujh mein tu, tu hi tu basa
Naino mein, jaise khwaab saa
Jo tu na ho toh pani pani naina
Jo tu na ho toh main bhi hunga main naa
Tujhi se mujhe sab ataa
Mujh mein tu... tu hi tu basa
Naino mein jaise khwaab saa

Ishq aashiqui mein
Kuch log chhant.ta hai
Zakhm bant.ta hai
Unhe dard bant.ta hai
Tod deta hai khwaab saare dekhte dekhte
Kar de barbaad saa
Jo tu na ho toh pani pani naina
Jo tu na ho toh main bhi hunga main naa
Tujhi se mujhe sab ataa
Mujh mein tu... tu hi tu basa
Naino mein jaise khwaab saa

Safar do kadam hai, jise ishq log kehte
Magar ishq wale, sab safar me hi rehte
Khatm hota na umr bhar hi, Ishq ka raasta
Hai ye behisaab sa
Jo tu na ho toh pani pani naina
Jo tu na ho toh main bhi hunga main naa
Tujhi se mujhe sab ataa
Mujh mein tu
Tu hi tu basa
Naino mein jaise khwaab saa


***** lyrics from Special 26 Hindi Movie


Monday, January 14, 2013

आवड आवड असते !



आवड आवड असते !

आ युष्य मजेत जावे असे कुणाला वाटत नाही? फक्त ही मजा आपल्या शरीरातूनच उत्पन्न होते, हे मात्र बऱ्याचजणांना माहीत नसते. म्हणजे असे बघा- तुम्ही महाबळेश्वरला गेला आहात. हवा मस्त आहे. सगळे मस्त बागडताहेत, पण तुमचे पोट साफ झालेले नाही आणि तुमच्या पृष्ठभागाला एक गळू झालेले आहे आणि ते ठसठसते आहे. सारी मजा गेलीच म्हणून समजा. तर ही मजा आपल्याला सदैव घेता यावी यासाठी आपल्याला स्वत:कडे लक्ष देणे आवश्यक असते. हे आपण आपल्या जीवनशैलीत बदल करून करू शकतो. असे केले की, मजा करावी लागत नाही, मजा येत राहते.
'जीवनशैली' हा शब्द 'लाइफस्टाईल' या इंग्रजी शब्दाचे भाषांतर म्हणून मराठीत योजिला जातो. शैली हा शब्द खरे तर खूपच व्यक्तिगत आहे. म्हणजे 'अमुक अमुक वादकाची शैली' असा प्रयोग आपण करतो. पण सध्याची जीवनशैली असे म्हटले, की एक सामाजिक आशय त्याला प्राप्त होतो. प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे; म्हणजे दुसऱ्यासारखे जगण्याचा प्रयत्न न करता स्वत:सारखे जगण्याकडे लक्ष देणे फार आवश्यक ठरते.
स्वत:सारखे जगायचे म्हणजे कसे जगायचे? तर ज्या जीवनपद्धतीचा अंगीकार केला असता आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य सुधारत राहते, ती जीवनपद्धती आपल्या दृष्टीने योग्य असे समजायचे. जर का आपल्या स्वास्थ्यास हानिकारक अशा गोष्टी आपण वारंवार करीत असू आणि शरीर-मन आपल्याला दु:ख या संवेदनेतून सांगत असेल तर आपल्याला लवकरात लवकर आपली जीवनपद्धती बदलायला हवी.
आपण जे काही पूर्वसुकृतानुसार शरीर-मन घेऊन जन्माला आलो आणि ज्या परिस्थितीत जन्माला आलो त्या शरीर-मनाचा सवरेत्कृष्ट वापर आपल्याला आपल्या जीवनपद्धतीत करता आला पाहिजे. हे करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आवडते ते शिक्षण घेणे. आपल्याला आवडते ते शिक्षण घेता आले म्हणजे पुढे आवडता व्यवसाय करायला सोपे जाते. सध्याच्या काळात आपल्याला काय आवडते ते बघण्याऐवजी पैसे कुठे जास्त मिळतील हे बघितले जाते, हे फार चुकीचे आहे. ज्यात मन लागत नाही ते शिकणे फार अवघड असते. लहानपणापासूनच मुलामुलींचा कल पाहून चतुराईने त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात काम करता येईल असे पाहणे महत्त्वाचे ठरते. आपल्या आवडत्या विषयाशी संबंधित असे काम करणे हे योग्य जीवनपद्धतीचे दुसरे वैशिष्टय़.
आपल्या आवडत्या विषयात काम करायला मिळणे ही पहिली पायरी असली तरी त्यापासून उद्भवणारा धोका असा की अविश्रांत काम करण्याची वृत्ती उत्पन्न होऊ शकते. श्रीखंड कितीही आवडले तरी खातच बसले म्हणजे अपचन होणारच. म्हणजे वेळच्या वेळी खाणे थांबवणे जसे आवश्यक तसेच कामही वेळच्या वेळी थांबवता येणे आवश्यक असते. आज रोज १६ ते १८ तास काम करणारे अनेक वेठबिगार संगणकतज्ज्ञ पाहिले की खरोखर वाईट वाटते. एखादे वेळेस अगदी २४ तास काम करणे वेगळे आणि रोज १८ तास काम करणे वेगळे. आता या वयात खूप काम करून खूप पैसे मिळवायचे आणि मग आयुष्य 'एन्जॉय' करायचे असा तद्दन बिनडोक विचार या मागे बहुतांश लोकांचा असतो.
आवडते काम हा एक भाग असेल तर आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवणे हा योग्य जीवनपद्धतीचा तिसरा भाग. चित्रापेक्षा चौकट आवडल्याने जे लग्न करतात, त्यांना आयुष्यात पुढे घरी येताना तणाव उत्पन्न होतो, जसे नावडते काम करणाऱ्यांना कामावर जाताना तणाव उत्पन्न होतो. आणि या दोनही गोष्टी बिघडल्या असतील तर मग विचारायलाच नको.
आवडता छंद जोपासणे हा योग्य जीवनपद्धतीचा चौथा भाग. अगदी मनापासून त्या छंदात मश्गुल होणे हे ध्यानधारणेपेक्षा कमी नाही. वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत तुम्ही त्या छंदातले जवळजवळ तज्ज्ञच बनता. मग पुढे या छंदाचे शिक्षण द्यायचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
आपल्या शरीरमनाची सुयोग्य देखभाल करणे हा योग्य जीवनपद्धतीचा पाचवा भाग. त्यासाठी फक्त स्वत:साठी एक तास काढता येणे फार आवश्यक असते. 'व्यायाम' या शब्दाचीच काही जणांना अ‍ॅलर्जी असते. बिचाऱ्यांना त्यात किती आनंद आहे, हे कधीच कळलेले नसते. त्यामुळे ते त्या वाटेलाच जात नाहीत आणि मग 'स्पाँडिलायटिस' 'आथ्र्रायटिस' अशी लेबले घेऊन ते आयुष्य काढतात. आपल्या शरीरातील ताकद, लवचीकपणा आणि दमश्वास हा कायम वाढता ठेवण्याचा प्रयत्न करणे हे त्यासाठी आवश्यक असते. परिस्थिती जशी आहे तशी पाहता येण्यासाठी सतत भानावर राहण्याची कलादेखील साध्य करायला लागते. २४ तास सुयोग्य श्वासात राहणे हे त्यासाठी उपयुक्त ठरते.
आपण जे खातो, त्याचेच शरीर बनते. त्यामुळे कोणतीही गोष्ट खाताना या गोष्टीचे शरीर होऊ द्यायचे की नाही एवढेच ठरवायचे असते. सामान्यपणे जाहिरात केलेल्या गोष्टी न खाणे अगर पिणे आणि नैसर्गिक पदार्थ जमेल तितके खाणे हे महत्त्वाचे. भूक लागेल तरच खाणे हा सोपा नियम पाळावा.
उत्तम वाहन आणि उत्तम कपडे हे जीवनपद्धतीचे महत्त्वाचे अंग आहे. पण माणसामुळे कपडे अगर वाहन शोभून दिसले पाहिजे. छान तब्येतीची मुलगी अगर मुलगा कुठल्याही वाहनावर आले किंवा सामान्य कपडे पेहरून आले तरी छानच दिसतात. मोराची पिसे लावून कावळा मोर होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. पण कावळा जर कावळा म्हणून वागला तर देखणाच दिसतो.
सध्याच्या जीवनपद्धतीत मूठ जशी बंद करता आली पाहिजे, तशीच योग्य वेळी उघडताही आली पाहिजे. सामान्यपणे उत्तम खाणे, उत्तम पुस्तके, प्रवास, छंद आणि मदत या गोष्टींवर खर्च केल्यामुळे आयुष्याचा स्तर वाढता राहतो. अनेक मित्रमैत्रिणी मिळतात. आयुष्य श्रीमंत होते. चालताना थांबण्याचे भान, तर थांबल्यावर चालण्याचे भान आयुष्याचा तोल बिघडू देत नाही.
कोणत्याही जीवनपद्धतीत कुणाची कॉपी करणे हे सर्वथैव त्याज्य असायला हवे. मी माझ्या मस्तीत राहणार तर तो त्याच्या मस्तीत राहणार. यात मस्ती या शब्दाचा अर्थ उर्मटपणा अगर मस्तवालपणा असा नाही तर आपल्या लयीत आयुष्य काढणे असा आहे. आपल्या आयुष्याची लय ज्याला सापडली त्याला जीवनपद्धती सापडलीच! आता सारे व्यवस्थित होत राहणारच!
या लेखमालेत वरील सर्व अंगांचा आपण विचार करणार आहोत. वरील मुद्दय़ांसोबत प्रासंगिक अशा काही गोष्टीही यात येतील. स्त्री-पुरुष संबंध ही एक अत्यानंदाची गोष्ट असताना त्याचा पूर्ण विचका झालेल्या समाजात आपण राहत आहोत, हे भान आपल्याला आले तर कमीत कमी पुढच्या पिढीला तरी आपण त्यातून मुक्ती देऊ शकू. मजेने आयुष्य काढणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण वापरूयात. हा आपला दु:खी समाज आहे, कारण एकमेकाला त्रास देण्यात आपल्याला मजा येते. कुणी सुखात असलेला आपल्याला बघवत नाही. आपल्या दु:खापेक्षा दुसऱ्याचे सुख आपल्याला जास्त दुखते. कुणी मजेत राहतो आहे याचा अर्थ काहीतरी चूक होते आहे असे मानणारे महापुरुष या समाजात आहेत. आयुष्य म्हणजे केवळ दु:ख म्हणून परलोकाकडे डोळे लावून बसलेल्या अज्ञानी लोकांच्या झुंडी इथे आहेत. दु:ख याचा अर्थ माझे काहीतरी चुकते आहे असा न घेता आयुष्य म्हणजेच दु:ख असा अनर्थ काढून मोकळे होणारे काही कमी नाहीत. आपल्या आयुष्यात मजा सतत आली पाहिजे. करायला लागता कामा नये, एवढे कळले तरी खूप झाले.

 
***    स्वप्नील  वाघमारे  ***