Wednesday, August 29, 2012

आकलन : तरुण भारत आणि वयोवृद्ध सरकार

आकलन : तरुण भारत आणि वयोवृद्ध सरकार


जनतेचे वय व सरकारचे वय हे परस्परपूरक असले की देशाचा गाडा सुरळीत चालतो. भारतात आज तरुणांची संख्या सर्वाधिक असली तरी देशाचा गाडा हाकणारे सत्तरीत पोहोचले आहेत.. साहजिकच देश मंदगतीने चालणार. भारत आज जगातील सर्वात तरुण देश म्हटला जातो. जगातील बलाढय़ देशांशी तुलना करता भारतात सर्वाधिक तरुण आहेत. भारताचे सरासरी वय हे अवघे २६ वर्षे आहे. वीस ते तीस या वयांतील सर्वाधिक लोकसंख्या जगात भारतामध्ये आहे. पण भारतामध्ये जोश, सामथ्र्य, नावीन्य, कल्पकता अशी तरुणाईची वैशिष्टय़े फारशी दिसत नाहीत.
उलट हा देश अजूनही धीमेपणे चालणारा, परंपरावादी, आत्ममग्न असा दिसतो. इतके तरुण असलेला देश चैतन्याने रसरसलेला दिसला पाहिजे. परंतु, चैतन्य, धाडस हे गुण क्वचितच कुठे दिसतात.
गुलामगिरीमुळे समाजात मरगळ येते. कर्तृत्व हरवते. या देशाने हजारो वर्षांची गुलामगिरी सहन केली. मुस्लिमांच्या काळात राजकीय तर ब्रिटिशांच्या काळात सांस्कृतिक दास्यातही देश अडकला. कित्येक शतकांच्या गुलामीमुळे जगण्याची रग हा देश गमावून बसला. बंडखोरी या देशातून नाहीशी झाली. सामथ्र्यवान होऊन परकीयांविरुद्ध आवाज उठविण्याऐवजी परकीयांच्या आश्रयाने स्वकीयांना दडपण्याचा सोपा मार्ग या देशातील अनेकांनी स्वीकारला. साहस करावे, मर्दुमकी दाखवावी, नवीन प्रदेशांचा शोध घ्यावा, नवी शास्त्रे शोधून काढावीत, असंख्य प्रयोग करावेत, जीवावर बेतले तरी हरकत नाही, पण अभ्युदयासाठी धाडस करावे ही उमेद या देशात राहिली नाही. हे गुण लखलखीतपणे दाखविणारे शिवाजी महाराजांसारखे काही अपवाद या देशात जरूर निर्माण झाले. पण लवकरच अशा व्यक्ती ही फक्त अस्मितेची प्रतीके बनली. त्यांच्यातील गुणांची समाजात वाढ झाली नाही. त्या व्यक्ती पूजनीय बनल्या आणि समाज पुन्हा स्थितिशील राहिला.
गुलामीच्या काळात तरुणांना संधी मिळाली नाही हे समजण्यासारखे असले तरी स्वातंत्र्य मिळाल्यावर परिस्थितीत फरक पडायला हवा होता. परंतु, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पासष्ट वर्षांनीही परिस्थिती बदललेली नाही. आज देशात सर्वाधिक तरुण असले तरी देशाचे नेतृत्व वृद्धांकडे आहे. स्वातंत्र्य चळवळीत तरुण प्रचंड संख्येने सामील झाले होते. पण स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सत्तेवर आलेले सरकार हे वयोवृद्धांचेच होते. किंबहुना थकलेल्या नेतृत्वामुळे ब्रिटिशांना वाटाघाटी करणे सोपे झाले असेही म्हटले जाते. त्यानंतरही इंदिरा व राजीव गांधींचा अपवाद सोडला तर भारतातील सरकार हे नेहमी सत्तरीपुढील वृद्धांचे सरकार राहिले.
आजही भारतीय लोकसंख्येचा तोंडवळा पंचविशीचा असला तरी सरकारचा तोंडवळा पासष्ट वर्षांचा आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग ऐंशी वर्षांचे आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी ऐंशी पार केली आहे. याआधीच्या पंतप्रधानांकडे पाहिले तरी नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी यांनी  सत्तरी पार केली होती. मोरारजी देसाई ८१व्या वर्षी पंतप्रधान झाले. राजीव गांधी हे एकमेव तरुण पंतप्रधान.
अन्य देशांशी तुलना करता भारतातील जनतेचे वय आणि सरकारचे वय यातील फरक ठळकपणे लक्षात येतो. चीनमधील सरकारचे सरासरी वय ६०च्या पुढे असले तरी चीनमधील जनतेचे सरासरी वयही ३५ आहे. यावर्षी चीनमध्ये नवे सत्ताधारी येतील. त्यांचे वय साठहून कमी असण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे वयातील ही दरी बुजविण्याचा प्रयत्न चीनमध्ये सुरू आहे. अमेरिकेत हा फरक साधारण वीस वर्षांचा पडतो. अमेरिकेचे सरासरी वय ३८ आहे तर सरकारचे वय ५९ आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष वयाने जनतेच्या बरेच जवळ आहेत. ओबामा एकावन्न वर्षांचे आहेत. बिल क्लिंटन अध्यक्ष झाले तेव्हा ४६ वर्षांचे होते. आज ब्रिटनचे पंतप्रधान ४५ वर्षांचे आहेत. टोनी ब्लेअर हे ४३व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. जगातील सधन देशांचा तरुण नेतृत्वाकडे वाढता कल दिसतो. सधन देशांत जनता व सरकार यांच्या वयात फार अंतर नसते. जर्मनी व रशियामध्ये हे अंतर अवघे सात-आठ वर्षांचे आहे तर भारतात तब्बल चाळीस वर्षांचे.
वयामुळे नेतृत्वाच्या क्षमतांना मर्यादा येतात. व्यवसायात माणसाची नेमणूक करताना अनुभवाबरोबर वयाचा विचारही केला जातो. देशाचे नेतृत्व करताना अनुभवाला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे यात शंका नाही. पण सरकारचा एकूण चेहरा हा जनतेच्या सरासरी वयाशी थोडा तरी जुळणारा नसावा का?
सरकार व जनतेच्या वयामधील फरक वाढला की देशात अस्थिरता येते असे जगभर आढळून आले. बहुसंख्य जनतेच्या आशाआकांक्षांना सरकार त्याच तीव्रतेने प्रतिसाद देत नाही वा वयामुळे देऊ शकत नाही. सध्या भारतात हे जाणवते. सध्याच्या मंदीत बऱ्याच संधी दडलेल्या आहेत असे तरुण वर्गाला वाटते. परंतु या तरुणांना नेतृत्वाची संधी मिळत नसल्याने नव्या कल्पना, नवी धोरणे यांना सरकारी निर्णयात वाव मिळत नाही. वृद्ध नेते जात, धर्म, गट अशा जुन्या कल्पनांना धरून बसतात. कारण त्यामुळे त्यांना सत्ता मिळालेली असते. या जुन्या कल्पना राबवीत सावधगिरीच्या संथ मार्गाने सरकार चालते आणि तरुण वर्गाचा हिरमोड होतो. काही तरी करून दाखविण्याची उमेद तरुण वर्गात असते. ही संधी सत्तेमुळे मिळते. परंतु, सत्तेची पदे तरुणांसाठी मोकळी होत नसतील तर हा वर्ग निराश होतो. पन्नाशीतच मानसिकदृष्टय़ा वृद्ध झालेल्या व्यक्तींची संख्या भारतात सर्वात जास्त असेल. याचे कारण पन्नाशी आली तरी कर्तृत्व दाखविण्याची संधीच या व्यक्तींना मिळालेली नसते. राजकारणच नव्हे तर अन्य क्षेत्रांमध्येही अशीच स्थिती दिसून येते. कर्तृत्वाला पुरेसा वाव मिळत नाही म्हणून तरुण बंडखोर होत आहेत, अशी तक्रार लोकमान्य टिळक ब्रिटिशांकडे वारंवार करीत. आता सरकार आपलेच असल्यामुळे तशी तक्रार कोणाकडे करणार?
पन्नास ते पासष्ट हे खरे तर सत्ता राबविण्यासाठी उत्तम वय असते. या वयात शारीरिक क्षमता चांगल्या असतात. पुरेसा अनुभव गाठीशी असतो. तत्परता असते. धाडस दाखविता येते. याउलट साठी पार झाली की माणसाची शारीरिक क्षमता घटते. त्याचा परिणाम तत्परतेवर होतो. याशिवाय काळजी करण्याची वृत्ती वयाबरोबर बळावते. यामुळे माणूस अधिकाधिक जपून निर्णय घेऊ लागतो. सावधगिरी वेगळी व स्थितिशीलता वेगळी.
तरुण व वृद्ध समोरासमोर आले की त्यांच्या प्रतिसादात फरक पडतो आणि त्याचे काही परिणाम होतात. जगावर आजही जी-८ देशांचेच राज्य आहे. विकसनशील देशांना आपला विकास दर राखण्यासाठी याच देशांच्या मदतीची गरज आहे. आज जी-८ देशांतील राज्यकर्ते तरुण आहेत तर विकसनशील देशात वृद्ध राज्यकर्त्यांची फळी आहे. संपूर्ण आशियातच सरकारचे वय जास्त आढळून येते. जी-८ देशांतील राज्यकर्त्यांना काही झटपट निर्णय अपेक्षित आहेत. भारतासारखे देश त्यांना तत्परतेने प्रतिसाद देत नाहीत. यामुळे संधी हुकतात.
वयामुळे आणखी एक महत्त्वाचा फरक पडतो. वयाबरोबर सत्ता टिकविण्याची वृत्ती वाढीस लागते. धरलेली सत्ता सोडवत नाही. घराणेशाहीचे मूळ तेथे आहे. वय वाढले की आपल्या घराण्यातील तरुणांभोवती सत्ता फिरवत ठेवली जाते. भाजपचा अपवाद करता भारतात राज्याराज्यांत अशा पद्धतीने सत्ता केंद्रित झालेली आढळून येईल. यामुळेही तरुण वर्ग राजकीय प्रवाहापासून दूर राहणे पसंत करतो. जे राजकारणात येतात ते अल्पसंतुष्ट होऊन राहतात. त्यांच्या कर्तृत्वाला बहर येत नाही.
यावर उपाय काय? सत्तेला चिकटून राहण्याची मानवी प्रवृत्ती अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढय़ातील धुरिणांना चांगली माहीत होती. अमेरिकेचा पहिला प्रमुख म्हणून वॉशिंग्टन याची निवड झाली तेव्हा त्याच्या पदाला काय म्हणावे यावर बरेच महिने चर्चा झाली होती. डोक्यात सत्तेची हवा जाईल अशी कोणतीही बिरुदावली या पदाला असू नये असा आग्रह धरला गेला होता. शेवटी ‘प्रेसिडेन्ट’ हे त्या काळातील अत्यंत साधे नाव त्या पदाला दिले गेले आणि त्याचबरोबर दोन वेळा सत्ता उपभोगल्यावर सक्तीच्या निवृत्तीचे बंधन घालण्यात आले. अशी सक्ती नसूनही ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांत तरुण वर्ग सातत्याने सत्तेवर येतो आणि त्यानंतर आपापल्या व्यवसायात पुन्हा परतत असतो. सत्ता हा तेथे आयुष्य व्यापणारा व्यवसाय नसतो. भारतात मात्र तो तसा आहे.
सत्तेमध्ये सतत नव्या नव्या लोकांना संधी मिळणे हे भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात आवश्यक आहे. वयाच्या साठीनंतर सत्तेच्या पदावर कोणी राहू नये, अशी सूचना नानाजी देशमुख यांनी जनता सरकारच्या काळात केली. ती स्वत: आचरून दाखविली व पुढे वयाच्या नव्वदीपर्यंत सामाजिक कार्य करूनही दाखविले. मात्र अशा धाडसाची अन्य नेत्यांकडून अपेक्षा धरता येत नाही. जनतेच्या दबावाने हे शक्य आहे. दोन किंवा त्याहून अधिक वेळा सत्तेचे पद उपभोगलेल्या तसेच वयाची साठ वर्षे पार केलेल्या उमेदवाराला, मग तो कितीही चांगला असला तरी विजयी करायचे नाही असे जनतेने ठरविले तर बदल होऊ शकतो. देशात चैतन्य आणण्यासाठी अशा बदलाची गरज आहे.

..... जय भारत  जय  महाराष्ट्र  .......

Thursday, March 22, 2012



Open up with your ideas & participate in this competition with your posters.
whatever you feel ,want to show from your insider voice this is the medium where you can show your voice.



swapneel Waghmare

Saturday, March 17, 2012




आपल्याला खरच आधाराची गरज आहे का ???????

आज अजून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटतेय.


एकदा एक बलाढ्य मोठा राजा आपल्या राज्यात फेरफटका मारत असतो , तिथे त्याला एक पक्षी विकणारा दिसतो . त्या पक्षी विकणाऱ्याकडे राजाला दोन अतिशय सुंदर , लोभस,मनमोहक असे पक्षी दिसतात . राजाला ते खूप आवडतात, राजा त्या दोन्ही पक्ष्याचे योग्य ती किमत त्या पक्षी विकणार्याला देऊन त्यांना आपल्या मोठ्या राजवाड्यात आणतो. ते दोन्ही पक्षी राजा आपल्या मोठ्या बगिच्याच्या मध्यभागी ठेवतो.
             काही दिवस राजा स्वताहा त्या दोन्ही पक्ष्यांना जेवण आणि पाणी भरवत असे. त्याला त्या पक्ष्यांबद्दल खूप प्रेम वाटत असे. असा करता करता राजा रोजच्या दिवसातले काही तास त्या पक्ष्यासोबत घालवत असे. एके दिवशी राजाला असे वाटला कि आपण विनाकारण त्या पक्ष्यांना आपल्या प्रेमाच्या कैदेद ठेवले आहे, मग त्याने ठरवले कि आपण यांना त्यांच्या पिंजर्यातून मुक्त केले पाहिजे . राजाने मनात विचार पक्का केला आणि राजाने त्यांना त्यांच्या पिंजऱ्या मधून मुक्त केले.
            दोन्ही पक्ष्या मधला पहिला पक्षी  आपल्या  मुक्तापानाचा आनंद घेत एकदम उंच  उंच उडू लागला. सगळी कडे तो फेरी मारू लागला , या टोकाकडून त्या टोकाकडे तो उंच उंच भरारी घेत आपल्या आनंदात फिरू लागला. कधी या फांदीवर तर कधी त्या फांदीवर ,कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर नुसताच तो आपल्या आनंदात फिरू लागला. राजाला त्या पक्ष्याकडे बघून खूप आनंद झाला , राजाला वाटले कि मी विनाकारण त्या दोन्ही पक्ष्यांना आपल्या पिंजर्यात बांधून ठेवले. थोड्या वेळाने राजाचे लक्ष्य त्या दुसर्या पक्ष्याकडे गेले. तो पक्षी जवळच्याच झाडावर जाऊन एका फांदीवर बसला.
            राजाला वाटले कि आपण त्या पक्ष्याचा घात केला , एका चांगल्या पक्ष्याला उडण्यापासून मी वंचित ठेवले. राजाला वाटले कि त्या पक्ष्याने पण पहिल्या पक्ष्या सारखे उंच भरारी घ्यावी , पण काही केल्या तो पक्षी जागेवरून हललाच नाही.दुसऱ्या पक्ष्याने पण उडाव असे राजाला वाटू लागला. राजाने त्याला उडवण्यासाठी  प्रयत्न चालू केले , पण काही केल्या तो पक्षी काही उडतच नव्हता. राजाला थोडा राग आला पण राग न करता तो पक्षी का उडत नाही याची काळजी राजाला वाटू लागली.
              राजाने गावात दवंडी पिटवली कि जो कोणी त्या पक्ष्याला उडवून देईल त्याला योग्य ते बक्षीस दिले जाईल. बक्षिसाच्या लालसे पोटी बऱ्याच लोकांनी भरपूर प्रयत्न केले पण सगळ्यांना निराशाच हाती लागली . तो पक्षी काही केल्या उडण्यास तयार नव्हता . राजाला खूप वाईट वाटले , राजाने परत बक्षिसाची रक्कम वाढवली . परत नवीन नवीन लोकांनी त्या पक्ष्याला उडवण्यासाठी प्रयत्न चालू केले . कोणालाही यश संपादन झाले नाही , त्या पक्ष्याने काही ती फांदी सोडलीच नाही . काही जादुगारणी लोकांनी सुद्धा प्रयत्न केले पण सगळेच अपयशी ठरले.मग  तांत्रिक मांत्रिक या लोकांनी पण आपल्या प्रयत्नाची पराकाष्टा लावली , तरीही कोणालाही यश संपादन झाले नाही. तो पक्षी आपली फांदी काही केल्या सोडत नसे. राजाची चिंता अजून वाढू लागली होती. राजाने ज्या पारध्याने ते दोन पक्षी पकडले होते त्या पारध्याला सुद्धा पक्ष्यांना उडवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले , तो पारधीही अपयशी ठरला. ते पाहून राजा दिवसभर चिंतातूर राहू लागला , राजाचा अस्वस्थपणा वाढू लागला.
            कोणीतरी राजाला सांगितले कि दुसऱ्या राज्यातून कोणी माणूस आला आहे, आपण  त्याला प्रयत्न करण्यास सांगू या. राजाने लगेचच दोन लोकांना पाठवून त्या परदेशी माणसाला बोलवणे पाठविले. राजाने त्याला सगळी हकीकत सांगितली. तो माणूस राजाची परवानगी घेऊन त्या पक्ष्याकडे आला. थोड्याच वेळात तो पक्षी या फांदी वरून त्या फांदीवर फिरू लागला. त्या पक्ष्याने संपूर्ण बगीच्याचा ताबा घेतल्यासारखा तो सगळी कडे भरारी घेऊ लागला.
          राजाने त्या पक्ष्याला बगिच्यामध्ये उंच भरारी घेताना बघितले आणि राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो लगेच बगिच्या मध्ये आला आणि त्या पक्ष्याच्या उडण्याचा आनद घेऊ लागला. राजाने त्या पर- प्रांतीय माणसाला भरगोस बक्षीस दिले. आणि त्याला विचारले कि तू त्याला कसे काय उडवले.
        त्या पर प्रांतीय माणसाने एकदम अदबीने राजाला कुर्निसात करत सांगितले कि मी फक्त त्याचा आधार काढून घेतला आणि त्याने स्वताच आपल्याला असलेल्या पंखांचा वापर करून भरारी घेतली , म्हणजे तो पक्षी ज्या फांदीवर उभा होता ती फांदी मी कापून टाकली ,ज्या फांदीवर त्याने ईतके दिवस आधार घेतला होता तीच फांदी आता नसल्यामुळे त्याला उडण्याशिवाय पर्यायाच नव्हता.
          जेव्हा आपल्याकडे काहीच आधार नसतो तेव्हा आपण आपली खरी ताकत ओळखतो. बऱ्याच वेळा आपल्याला कोणची न कोणाची आधाराची गरच असते , पण जेव्हा आपल्याला आपल्याकडील खऱ्या शक्तीची ओळख होते तेव्हा आपल्याला कोणाच्याही आधाराची गरज उरत नाही,आपण आपले जीवन सुंदर बनवत जातो. आपले जग हे आपणच सुंदर बनवावे तेही कोणाचे हि आधार न घेता .कधीही कोणावरही अवलंबून राहू नये. कधी हि कोणीही कोणाकडून कसलीही अपेक्षा करू नये किवा कोणाचाही आधारवर जगण्याची सवय लाऊ नये.



@#@#  स्वप्नील वाघमारे  @#@#
           
           




Saturday, March 3, 2012

Hey bhagwan mujhko tuh jindagi dubara de


heyy.. choti si hai jindagi ,usse chota ek sapna
heyy.. choti si hai jindagi,usse chota ek sapna
ek baar is dharti pe dekh loon khuda apna

hey bhagwan mujhko tuh jindagi dubara de..

raat ke andhere mein , mujhe jo ujala de
jab thak jaaon toh apni ,god ka sahara de

hey bhagwan mujhko tuh ,jindagi dubara de..

aaj bhi tu dekhta hoga  kahi dur satwan aasman
 kaise khoya ja raha hai apne aap mein insaan

hey bhagwan mujhko tuh ,jindagi dubara de..
hey bhagwan mujhko tuh ,jindagi dubara de..

hey dil ko sambhaloon kaise  ,tanhaayi mein doobi raat hai
hey dil ko sambhaloon kaise ,tanhaayi mein doobi raat hai
akele ho toh kya hua re ,uska jo sahara hai

hey bhagwan mujhko tuh ,jindagi dubara de..

Lyrics of Raghu Dixit 
Hey bhagawan

Tuesday, February 28, 2012

हजारो मुखांतून निनादले राष्ट्रगीताचे सूर..!



हजारो मुखांतून निनादले राष्ट्रगीताचे सूर..!

नव्या विश्वविक्रमाला समूह राष्ट्रगीताची गवसणी!

भारतीय राष्ट्रगीताच्या जन्मशताब्दीनिमित्त दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये हजारोंच्या संख्येने समूह सुरातजन गण मन..’ म्हणून ठाणेकर नागरिकांनी राष्ट्रभक्तीचे विराट दर्शन घडविले. १५ ऑगस्ट अथवा २६ जानेवारी असा कोणताही राष्ट्रीय दिन नसतानाही सर्व वयोगटांतील ठाणेकरांनीदेश माझा मी देशाचा' या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत याबाबतच्या नव्या विश्वविक्रमास गवसणी घातली. या सोहळ्याचे ८० कॅमेरांनी चित्रीकरण करण्यात आले असून त्याची काटेकोरपणे तपासणी केल्यानंतरच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे.
       
१५ ऑगस्ट अथवा २६ जानेवारी असा कोणताही राष्ट्रीय सण नसतानाही भर दुपारच्या उन्हाची पर्वा करता हजारो विद्यार्थी आणि विविध वयोगटांतील नागरिक दुपारी तीन वाजल्यापासून मैदानात उपस्थित होऊ लागले. जय हो.., वंदे मातरम, मेरे देशकी धरती, मेरे वतन के लोगो, शूर आम्ही सरदार.. अशा अनेक देशभक्तीपर गाण्यांनी वातावरणनिर्मिती होत होती.
    पोलीस बॅन्ड, मल्लखांबांची प्रात्यक्षिके तसेच दिलखेचक समूह नृत्यांनी हजारोंच्या संख्येने जमलेल्या रसिकांना खिळवून ठेवले. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आपापल्या शाळेचे फलक हाती घेत निरनिराळ्या दरवाजांनी मैदानात येत होते. काही विद्यार्थ्यांनी डोक्यावर घातलेल्या टोप्यांनी मैदानात तिरंगा साकारला होता. अशा सर्वार्थाने भारलेल्या वातावरणात अखेरीस समूह सूरात राष्ट्रगीत म्हटले गेले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आणि भारती आमटे, गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, खेळाडू सीमा शिरूर, कलादिग्दर्शक नितीन देसाई, या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
         कोणत्याही विक्रमासाठी नाही तर राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचे सतीश उतेकर यांनी  सांगितले.प्रत्येक शहरात अशाप्रकारचा कार्यक्रम आयोजित व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.    

Bottom of Form